वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा – मालसा

आज दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य(मालसा) व लातूर जिल्हा कार्यकारिणी मालसाच्या वतीने विजयकुमार ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲड. राजाराम आढाव व ॲड. सौ. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच राजस्थान मध्ये ज्या प्रमाणे वकील संरक्षण कायदा लागू करण्यात आला त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुध्दा वकील संरक्षण कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी मालसा तर्फे करण्यात आली. यावेळी मालसाचे सहसचिव दिपक घटकार, सीईटी सेल सदस्य कृष्णा माळगे, सीईटी सेल सदस्य दत्तात्रय येरमुळे, जिल्हा संघटक विनोद बडगे, कॉलेज अध्यक्ष शंकरप्रसाद गिरी, सहकारी मनीषा गायकवाड, सत्यभामा अशटुरे,मोहन वाघमोडे, हर्षवर्धन कदम, निलेश मस्के, नागमा बागवान, वैभव बेल्लेवाड आदी मालसा पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these